मुम्बई

“स्वतःला वेळ…” ऋता दुगुर्ळने सांगितलं नाटकासह छोट्या पडद्यावरुन ब्रेक घेण्यामागचे कारणमात्र नुकतंच तिने या सर्व टीकांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे.‘अनन्या’, ‘टाईमपास ३’ या दोन्ही चित्रपटांमुळे ती अजूनही प्रसिद्धीझोतात आहे. काही दिवसांपूर्वी तिची प्रमुख भूमिका असलेली मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर तिच्यावर अनेकदा टीका होताना पाहायला मिळते. मात्र नुकतंच तिने या सर्व टीकांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

ऋता दुर्गुळने नुकतंच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने मालिका तसेच नाटकातून ब्रेक घेण्यामागचे कारण सांगितलं आहे. तसेच सलग दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित होण्याबद्दलचा अनुभवही तिने सांगितला. यावेळी ती म्हणाली, “अनन्या या चित्रपटाचे शूटींग २०२० मध्ये मार्चपूर्वी आणि टाइमपास ३ या चित्रपटाचे शूट हे दुसऱ्या लॉकडाऊनपूर्वी झाले होते. मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल काहीही माहिती नव्हतो. ते कधी प्रदर्शित होणार आहे, याबद्दलही काही माहिती नव्हते. तर दुसरीकडे मी आठवड्याचे सहा दिवस सलग मालिकांमुळे घराघरात दिसायची. एकीकडे दिपू, अनन्या आणि पालवी या तिन्ही भूमिका साकारता आल्या यासाठी मी स्वतःला नशिबवान समजते.”

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *